Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

दिलेला शब्द पाळला! विठ्ठलनगरचा रस्ता आठवडाभरात चालण्यायोग्य; दिलीप अण्णा खैरे यांची तातडीची कार्यवाही

 

येवला | प्रतिनिधी
"दिलेला शब्द पूर्ण करायचाच" या भूमिकेची प्रचिती देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप अण्णा खैरे यांनी विठ्ठलनगर परिसरातील खराब रस्त्याची तातडीने दखल घेत अवघ्या आठवडाभरात तो रस्ता चालण्यायोग्य करून दिला.
मागील मंगळवारी येथील संपर्क कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीदरम्यान डॉ. योगेश जेजुरकर आणि विशाल कळमकर यांनी विठ्ठलनगर परिसरातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था खैरे यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

त्यावेळी त्यांनी, "पुढच्या मंगळवारी मी तुमच्या घरी चहा प्यायला येईन; तोपर्यंत हा रस्ता चालण्यायोग्य करून देतो," असा शब्द नागरिकांना दिला होता.
आज मंगळवारी येवला दौऱ्यावर असताना दिलीप अण्णा खैरे यांनी दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवत श्री गणेश भावसार यांच्या घरापासून श्री अतुल गटे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर तातडीने मुरूम व खडी टाकून रस्ता नागरिकांच्या वापरासाठी चालण्यायोग्य करण्यात आला.


यावेळी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत खैरे यांच्या तत्परतेचे स्वागत केले. तसेच दिलीप अण्णा खैरे यांनी नागरिकांना आश्वस्त करत सांगितले की, ना. छगनराव भुजबळ यांच्या माध्यमातून या परिसरात लवकरच कायमस्वरूपी काँक्रीट रस्त्याचे काम हाती घेतले जाईल.


या कार्यवाहीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, दिलेला शब्द वेळेत पूर्ण करणारे नेतृत्व म्हणून दिलीप अण्णा खैरे यांच्या भूमिकेची परिसरात चर्चा होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या