Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाडमध्ये माणुसकीचा आदर्श! विसरलेले पैशांचे पाकीट प्रामाणिकपणे केले परत

 

मनमाडमध्ये माणुसकीचा आदर्श! विसरलेले पैशांचे पाकीट प्रामाणिकपणे केले परत

२५ हजार रुपयांचे पाकीट सुरक्षित ठेवून ज्येष्ठ नागरिकाला दिला दिलासा

मनमाड : शहरातील बाजारपेठेत माणुसकी आणि प्रामाणिकपणाचा आदर्श घालून देणारी घटना समोर आली आहे. मुंबई येथील रहिवासी असलेले गुलाम कुरैशी हे काही कामानिमित्त मनमाड येथे आले होते. ते सचिन लॉज येथे मुक्कामी थांबले होते.

कामानिमित्त ते बाजारपेठेत आले असताना वय जास्त असल्याने त्यांना परत लॉजचा पत्ता शोधताना अडचण येत होती. यावेळी ते गणेश कोठावदे यांच्या दुकानाजवळ थांबले आणि त्यांनी लॉजचा पत्ता विचारला. दरम्यान, त्यांना तहान लागल्याने त्यांनी पाण्याची बाटली कुठे मिळेल, अशी विचारणा केली. गणेश कोठावदे यांनी समोरच पाण्याच्या बाटलीचे दुकान असल्याचे सांगितले.

याच दरम्यान गुलाम कुरेशी यांनी पैसे काढताना आपले पैशांचे पाकीट गणेश कोठावदे यांच्या दुकानातच विसरले. त्यानंतर ते लॉजवर गेले. काही वेळाने त्यांना पाकीट हरवल्याचे लक्षात आले. रात्री त्यांनी पुन्हा गणेश कोठावदे यांच्याशी संपर्क साधून पाकिटाबाबत विचारणा केली.

यावेळी गणेश कोठावदे यांनी त्यांना धीर देत सांगितले की, "तुम्ही काळजी करू नका, तुमचे पाकीट माझ्याकडे सुरक्षित आहे." त्यांनी तत्काळ ते पाकीट गुलाम कुरेशी यांच्या स्वाधीन केले. या पाकिटात सुमारे २० ते २५ हजार रुपयांची रक्कम होती.

आपले पैसे परत मिळाल्यानंतर गुलाम कुरेशी यांनी गणेश कोठावदे यांचे आभार मानत सांगितले की, "आजच्या काळातही अशी माणुसकी जिवंत आहे, याचा मला आनंद आहे."

गणेश कोठावदे यांच्या प्रामाणिकपणामुळे मनमाड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, त्यांच्या या कृतीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

"पैशांपेक्षा मोठी असते माणुसकी... आणि मनमाडने पुन्हा एकदा ती दाखवून दिली!"

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या