Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

पुण्याहून अमृतसरपर्यंत सलोखा सायकल यात्रा: असलम बागवान यांचा पंजाब बाढग्रस्तांसाठी भाईचार्याचा संदेश


पुणे, दि. १९ सप्टेंबर २०२५: भारत देश हा विविधतेत एकता आणि बंधुभावाची मिसाल आहे. येथे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्व धर्मांचे लोक एकत्र येऊन देशासाठी आणि समाजासाठी कार्य करतात. अशाच एका देशभक्त आणि समाजसेवक असलम इसाक बागवान यांनी पंजाबमधील बाढग्रस्तांसाठी पुण्याहून अमृतसरपर्यंत सलोखा सायकल यात्रा सुरू केली आहे. या यात्रेचा उद्देश पंजाबमधील बाढीमुळे नुकसान झालेल्या गावकऱ्यांसाठी मदत गोळा करणे आणि सामाजिक सलोखा व भाईचारा मजबूत करणे हा आहे.

नुकत्याच झालेल्या पंजाबमधील भयंकर पूरामुळे शेकडो गावे उद्ध्वस्त झाली. घरं, सामान, पशुधन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या पंजाबी बांधवांनी प्रत्येक संकटात देशाला साथ दिली, दररोज लाखो भुकेलेल्यांना लंगराद्वारे अन्न पुरवले, युद्ध असो वा आपदा, नेहमीच सेवेसाठी पुढे राहिले, तेच आज निसर्गाच्या प्रकोपाने त्रस्त आहेत. अशा वेळी त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे.

या उद्देशाने असलम इसाक बागवान, इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे सदस्य, यांनी १४ सप्टेंबरपासून पुण्याहून अमृतसरपर्यंत सायकल यात्रा सुरू केली आहे. प्रत्येक गावात आणि खेड्यात थांबून ते पंजाबमधील बाढग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करत आहेत. आज त्यांचा प्रवास मनमाड शहरात पोहोचला, जिथे स्थानिक सामाजिक संस्था आणि विविध धर्म-जातींच्या नागरिकांनी या सायकल यात्रेला पाठिंबा देत आपली मदत प्रदान केली. मनमाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेल्वे स्टेशन आणि बाजारपेठेपर्यंत एका आवाहन यात्रेचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये अनेकांनी सहभाग घेऊन भाईचार्याचा संदेश दिला.

अखिल नागरिक एकता मंच, कोंढवा, पुणे शहराचे उपाध्यक्ष छबिल कासम पटेल यांनी असलम बागवान यांच्या या देशभक्ती आणि समाजसेवेचे कौतुक केले. ते म्हणाले, “असलम बागवान यांच्यासारखे देशभक्त भारताच्या आणि पुण्याच्या, विशेषत: कोंढव्यासाठी अभिमानास्पद आहेत. त्यांनी घर-परिवाराचा विचार न करता देशासाठी आणि बंधुभावासाठी पुढाकार घेतला आहे. आम्ही सर्व प्रार्थना करतो की, असे देशभक्त निर्माण होत राहोत.”

या सलोखा सायकल यात्रेच्या माध्यमातून असलम बागवान यांनी देशात एकता आणि भाईचार्याचा संदेश पसरवला आहे. त्यांच्या या कार्याला आपल्या सर्वांनी साथ देऊन पंजाबमधील बाढग्रस्त बांधवांना मदत करावी, असे आवाहन अखिल नागरिक एकता मंचाने केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या