Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाडमध्ये मशहूर शायर रागिब ब्यालवी यांचा सत्कार

 

मनमाड (प्रतिनिधी) : भारतातील बहुचर्चित व लोकप्रिय शायर रागिब ब्यालवी यांचे मनमाड शहरात आगमन झाले. त्यांच्या आगमनानिमित्त मुस्लिम लायबरी व इकरा उर्दू शाळा तर्फे शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

शायर रागिब ब्यालवी यांनी आपल्या प्रभावी शायरीतून समाज प्रबोधनाचे कार्य केले असून त्यांच्या रचनांमुळे असंख्य लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले आहेत. मुस्लिम समाजात त्यांचे योगदान अमूल्य मानले जाते. यंदा त्यांनी हज यात्रा पूर्ण केली असून त्यानंतर प्रथमच मनमाडमध्ये त्यांचे आगमन झाल्याने शहरात उत्साहाचे वातावरण होते.

या कार्यक्रमाला कादर भाई (मुस्लिम लायबरी), एम. सलीम अहमद, डॉ. कुरेशी, बेग चाचा, नजमुल हुसेन मन्सुरी, रविराज आहिरे सर, हबीब खान, कादीर शेख, शकूर शेख, जानी भाई, मुजुम्मील खान, शेख जफर, शेख मोहसिन, हाजी शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या