Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाडमध्ये जमीयते उलेमा-ए-हिंदची मतदान प्रक्रिया पार पाडून नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती



मनमाड (प्रतिनिधी) : शनिवार, दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता मनमाड शहरात नगीना मस्जिद येथे जमीयते उलेमा-ए-हिंदची निवडणूक पार पडली. मतदान प्रक्रियेद्वारे नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.

निवडणूक प्रक्रियेत सर्व कामकाज शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडले. यावेळी मालेगाव येथील जबाबदार मौलाना आसिफ शाबान साहेब.कारी अखलाक जमाली, हाफिज अनीस अज़हर, हाफिज अब्दुल अज़ीज़, मौलाना हसन तसेच आरिफ भाई आदी मान्यवर उपस्थित राहिले.

मतदान प्रक्रियेतून पुढील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली :

सदर (अध्यक्ष) – मौलाना तौसीफ आलमगिरी,नायब 

सदर (उपाध्यक्ष) – मुफ्ती आसिम, मुफ्ती साकिब,जावेद इमेज

जनरल सेक्रेटरी (सचिव)- कादिर अब्बास शेख

जॉईंट सेक्रेटरी(सह सचिव) – इमरान गुलशेर खान, हुजैफा शकील शेख, शकील असरार शेख खाजिनदार 

– शोकत लतीफ तांबोळी,नायब खाजिनदार – शकील शेख जुबेर,

प्रचारक म्हणुन – फीरोज करीम शेख, 

सदस्य – इमरान अब्दुल गनी कादरी, मोहम्मद आरिफ इब्राहीम शहा, सरय्यद कयामुद्दीन अकिल, हाफिज आसिफ वसीम खान, दिरशेर खान, सलीम शेख उमर, हाजी इक्बाल फकीर मोहम्मद, मौलाना कामिल, हाफिज साजिद, इमाम रहमत मस्जिद, मुझाहिम, हाजी मरजद राठोड.

या वेळी जमीयते उलेमा-ए-हिंदच्या ऐतिहासिक योगदानाची आठवणही करून देण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत या संस्थेचा थेट सहभाग राहिला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जमीयते उलेमा-ए-हिंदचे कित्येक उलेमा शहीद झाले. या संघटनेने स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्याला “जेहाद” असा फतवा जारी केला होता. त्यामुले अनेक उलेमा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.

नवीन पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करून समाजहित व राष्ट्रहितासाठी सेवा करण्याचा संकल्प व्यक्त केला. शेवटी सर्वांच्या भारतात शांतता नांदवी या साठी दुआ करण्यात आली. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या