Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड शहरात भव्य तिरंगा पदयात्रेने देशभक्तीचा उत्साह; ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे जोरदार स्वागत

 


मनमाड, दि. 21 मे 2025: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हत्याकांडाला चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून दहशतवादी तळांवर यशस्वी हल्ला चढवला. या अभूतपूर्व यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करत राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी मनमाड शहरात भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेने संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले.

रुद्र हनुमान मंदिरापासून सुरू झालेली भव्य यात्रा

रुद्र हनुमान मंदिरापासून सुरू झालेल्या या तिरंगा पदयात्रेला मनमाडकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व धर्म, जाती, पंथ, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, कामगार आणि देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रत्येकाच्या हातात तिरंगा ध्वज आणि तोंडात ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणा यामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले. यात्रा मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना माजी सैनिकांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.


प्रमुख नेत्यांचा सहभाग 

या तिरंगा पदयात्रेत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, जयकुमार फुलवाणी, नारायण पवार, शहराध्यक्ष संदीप नरवडे, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, सहसंपर्कप्रमुख अल्ताफ बाबा खान, जिल्हा संघटक नाना शिंदे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, राजाभाऊ भाबड, युवासेना शहराध्यक्ष योगेश इमले, आर.पी.आय.चे अमोल नरवडे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीख, व्यापारी कॅटचे प्रमुख कल्पेश बेदमुथा, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलाल लुनावत, भाजपा कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष पंकज खताळ, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुमेर मिसर, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष जलील अन्सारी, ज्येष्ठ नेते उमाकांत राय, नीलकंठ त्रिभुवन, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा संघटक विकास वाघ यांच्यासह अनेक नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, शहरप्रमुख संगीताताई बागुल, विधानसभा संघटक नाजमा मिर्झा, तालुका समन्वयक नीताताई लोंढे, सविताताई व्यवहारे, सावित्रीताई यादव, मीनाताई केकान, रूपालीताई गालफाडे, अर्चनाताई सांगळे, हर्षदा तावडे यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.

पाकिस्तानचा निषेध, शहीदांना श्रद्धांजली 

यात्रेच्या समारोपावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेचा उद्देश विशद करत पाकिस्तानचा जळजळीत शब्दांत निषेध व्यक्त केला. साईनाथ गिडगे आणि पंकज खताळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये बलिदान देणाऱ्या वीर सैनिकांना सामूहिक श्रद्धांजलि अर्पण करण्यात आली. राष्ट्रगीताने या भव्य तिरंगा पदयात्रेची सांगता झाली.

राष्ट्रीय एकतेचा संदेश

या तिरंगा पदयात्रेने मनमाड शहरात राष्ट्रीय एकतेचा आणि भारतीय सैन्याच्या शौर्याचा जागर घडवला. शहरातील सर्व स्तरांतील नागरिकांनी एकत्र येत देशभक्ती आणि एकतेचा संदेश दिला. ऑपरेशन सिंदूरच्या यशाने प्रत्येक भारतीयाचे मन अभिमानाने भरून गेले असून, या यात्रेने सैनिकांचे मनोबल वाढवण्यासह देशभक्तीची भावना आणखी दृढ केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या