Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मानव अधिकार रक्षक मंचाच्या आक्रमक पवित्र्याने वीज वितरण कंपनीला खडबडून जाग!

 


मनमाड (प्रतिनिधी): मनमाड शहरातील हनुमान नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हुडको ईदगाह, विवेकानंद नगर,बुधलवाडी, आयु डी पी, परिसरासह अनेक भागांत गेल्या अनेक दिवसांपासून वीजपुरवठा सातत्याने चार ते पाच तास खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप खदखदत आहे. या गंभीर समस्येविरोधात मानव अधिकार रक्षक मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास डफळे यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनी (MSEDCL) ला जोरदार जाब विचारण्यात आला. नागरिकांच्या रोषाचा उद्रेक आणि मंचाच्या आक्रमक पवित्र्याने प्रशासनाला खडबडून जागे होण्यास भाग पाडले आहे.
विशेष बाब म्हणजे, तक्रारी नोंदवण्यासाठी असलेला MSEDCL चा कस्टमर केअर क्रमांक 02591-222384 हा बंद असल्याने नागरिकांचा संताप अधिकच भडकला. याबाबत विचारणा केली असता, विभागीय सहाय्यक अभियंत्यांनी "टेलिफोन एक्सचेंजमध्ये तांत्रिक बिघाड" असल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. या बेजबाबदार वृत्तीवर मंचाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हा प्रकार म्हणजे नागरिकांच्या हक्कांचा स्पष्ट भंग असल्याचा आरोप केला आहे
.

उल्हास डफळे यांचा इशारा: "ग्राहकांना भरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलन!"

या वेळी मानव अधिकार रक्षक मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास डफळे यांनी ठणकावून सांगितले, "वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित होणे हे ग्राहकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे. नियमानुसार, वीज वितरण कंपनीने सातत्याने खंडित होणाऱ्या पुरवठ्याबद्दल ग्राहकांना नुकसानभरपाई देणे बंधनकारक आहे. जर प्रशासनाने तात्काळ सुधारणा केल्या नाहीत, तर आम्ही तीव्र आंदोलन उभारू आणि जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारू!"

नागरिकांचा लढा, मंचाचा पाठिंबा!

या आंदोलनात उल्हास डफळे यांच्यासह मंचाचे कायदेशीर सल्लागार आबिद शेख, नवीद अंसारी, जोशुआ डफळे, अमोल नरवडे, अनिरुद्ध तोंडे, अकिब पठाण, लकी मोरे, सुरेश आहिरे, राजाभाऊ शुक्ला, सोनू उबाळे, स्वप्नील शिरसाठ, स्वप्नील बोदडे, प्रमोद हिंगमिरे, रोहित थोरात यांच्यासह मनमाड शहरातील शेकडो नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या सर्वांनी एकजुटीने वीज वितरण व्यवस्थेतील ढिसाळ कारभार आणि हलगर्जीपणावर तीव्र संताप व्यक्त केला.

नागरिकांचा अंतिम इशारा: सुधारणा नाही, तर रस्त्यावर उतरू!

नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या निष्क्रिय धोरणांविरोधात आवाज बुलंद केला असून, तात्काळ सुधारणा न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मानव अधिकार रक्षक मंचाने स्पष्ट केले की, "आम्ही यापुढे गप्प बसणार नाही. प्रशासनाने त्वरित पावले उचलून वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून जबरदस्त आंदोलन करू!"

प्रशासनाला खबरदारीचा इशारा!

मानव अधिकार रक्षक मंच आणि मनमाडच्या नागरिकांनी एकजुटीने दाखवलेल्या या आक्रमक पवित्र्याने वीज वितरण कंपनी आणि प्रशासनाला खडबडून जागे होण्यास भाग पाडले आहे. आता प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर वीजपुरवठ्यात सुधारणा झाली नाही, तर मनमाड शहरातील हा लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या