Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड शहराला 20 दिवसा आड पाणी, जबाबदार अधिकाऱ्याला जाब विचारणार का कोणी..?

 



जन आवाज न्युज संपादक.आफरोज अत्तार.

मनमाड शहराचा पाणी प्रश्न हा नेहमी जिव्हाळ्याचा मुद्दा राहिला आहे, मनमाड शहरात कित्तेक दिवस पाण्यावर राजकारण देखील झाले आहे,
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून करंजवन धरण ते वागदर्डी धरण योजनेतुन मनमाड शहराचे पाणी प्रश्न कायमचे सुटणार  पाणी प्रश्नाला पूर्ण विराम होणार आहे, 

परंतु स्थानिक प्रशासन, बेजबाबदार अधीकारीच्या अकार्यक्षम, नेतृत्वामळे, मनमाड शहरात सद्या पाणी पुरवठा हे 15ते20 दिवस आड होत आहे,

 मनमाड शहरातील जनतेने गंभीर भीषण पाणी टंचाई ही भोगलेली आहे, आज देखील जबाबदार अधिकारी मुळे शहरात ही कुत्रीम पाणी टंचाई निर्माण झाली आहे, शहरातील पाणी वितरण व्यवस्थाच्या अनियमितते मुळे अधिक गंभीर स्वरूप घेतले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील माय महिलांना वनवण करत भटकावं लागत आहे,

शहरात अशी गंभीर परस्थिती असतांना ही शहरातले पुढारी- प्रतिनिधी मात्र, अधिकारी वर्गा समोर मुंग गिळून गप्प आहे,  निवडणूक होणार असे बिगुल वाजु दया ,पाणी प्रश्नावर बघा कसे निवेदने मोर्चे, आणि कागदपत्रे हातात धरून विचित्र फोटो वृत्त पत्रात सुरु होतील, शहराचे पाणी प्रश्न गंभीर आहे असे बोलणाऱ्यांचे रांगा लागतील, तो पर्यंत सर्व गप्पच राहणार कोणीच काही बोलणार नाही, कारण सर्वांना साहेबांशी चांगले संबंध आहे, आणि कित्तेकांना तर कामाच्या बिलावर साहेबांची सही गरजेची आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया शहरातील संतापलेल्या नागरिकांकडून येत आहे,

स्थानिक प्रशासनाने निदान आठ दिवसाआड तरी पाणी पुरवठा करावं अशी मांगणी शहरातील नागरिकांतर्फे केली जात आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या