Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मुक्तीभुमी येथे समता सैनिक दल वर्धापनदिन साजरा विशेष सैनिक प्रशिक्षण शिबिर.

 

जन आवाज न्युज संपादक. आफरोज अत्तार 

   नाशिक जिल्हा पश्चिम अंतर्गत येवला मुक्तीभूमी येथील सभागृह  येथे 12 मार्च  रोजी समता सैनिक दल वर्धापन दिन साजरा करण्यात आला प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे येवला तालुका अध्यक्ष भाऊसाहेब जाधव  यांनी तथागत गौतम बुद्धांचा प्रती पुष्पहार अर्पण करून  समता सैनिक दलाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मेजर हिरामण अहिरे व  सीनियर डिव्हिजन ऑफिसर गौतम दादा कर्डक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुक्तिभुमि व्यवस्थापक  भगवान साबळे यांनी मेणबत्ती प्रज्वलित केली.            तसेच जगताप   वालहुताई यांनी सुगंधी पूजा करत  सामूहिक त्रिषरण, पंचशील ग्रहण करत समता सैनिक दलाचा  वर्धापन दिनानिमित्त  समता सैनिक दलाचा ध्वज फडकवत सामूहिक मानवंदना देऊन  समता सैनिक दलाचा वर्धापन दिनानिमित्त नवीन सैनिक जोडला जात असल्याने   प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करत  उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे येवला तालुका अध्यक्ष भाऊसाहेब जाधव गुरुजींनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा तालुका  सरचिटणीस दिपक गरुड गुरुजी यांनी केले. 

समता सैनिक दलाचा प्रमुख उद्देश गाव तेथे शाखा निर्माण करून प्रत्येक गावातील घरात सैनिक घडवणे  आणि समाजाचे संरक्षण कवच बनून राहणे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे असलेले कार्यक्रम तसेच  ऐतिहासिक दिनानिमित्त 6 डिसेंबर, 1जानेवारी, 14 एप्रिल, 13 ऑक्टोबर ,20 मार्च  चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि इतर असलेले सर्वच कार्यक्रमा  निमित्त  मानवंदना देणे तसेच आंबेडकरी कुटुंब हे सर्व बहुजन समाजाच्या हितासाठी अहोरात्र संपूर्ण देशभर भ्रमण करत आहे .आणि म्हणून समता सैनिकाची प्रमुख जबाबदारी आंबेडकरी कुटुंबाचे संरक्षण करणे. तसेच बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली नवीन समाज रचना निर्माण करणे , समाजामध्ये समता प्रस्थापित करणे अशा अनेक प्रकारच्या जबाबदारी समता सैनिक दलावर आहे आणि समता सैनिक दल सगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहे  आणि म्हणून  येवला मुक्तिभूमी येथे समता सैनिक दलाचा वर्धापन दिन साजरा करत  प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले .सदर प्रसंगी भाऊसाहेब जाधव (भारतीय बौद्ध महासभा येवला तालुका अध्यक्ष ), आद. दिपक गरुड (भारतीय बौद्ध महासभा येवला तालुका सरचिटणीस), रवी मामा सोनवणे (तालुका कार्यालयीन सचिव ),उत्तम वानखडे (चांदवड तालुका अध्यक्ष), उबाळे गुरुजी , मुक्ती प्रतिष्ठान व्यवस्थापन चे भगवान साबळे   , महिला सामाजिक कार्यकर्त्या वाल्हूबाई जगताप,  केशव धीवर, शशिकांत जगताप, सकाहरी  गरुड ,श्रावण गरुड ,गौतम गरुड ,विजय गायकवाड,  जयेश बागुल ,जीवन जाधव ,गणेश साळवे,अमोलगायकवाड , प्रकाश वानखेडे , भाऊसाहेब उबाळे.इत्यादीपदाधिकारी समता सैनिक  व कार्यकर्ते उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या