३० लाख रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवून अल्पसंख्याक नागरिकांची थट्टा करणाऱ्या राज्य शासनाच्या विरोधात मोठे जन आंदोलन उभारणार व राज्य शासनाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार :मुबारक शेख.
३० लाख रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवून अल्पसंख्याक नागरिकांची थट्टा करणाऱ्या राज्य शासनाच्या विरोधात मोठे जन आंदोलन उभारणार व राज्य शासनाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार :मुबारक शेख.
सोलापूर विशेष प्रतिनिधि शहाजहान अत्तार.
सोलापूर : राज्य शासनाने मागील दोन - तीन महिन्या पुर्वी वृत्तपत्र, न्युज चॅनल या प्रसार माध्यमा व्दारे मोठ-मोठ्या जाहिरात, बातम्या देऊन अल्पसंख्याक समाजातील जैन, मारवाडी, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौध्द, पारसी समाजातील गरजु नागरिकांसाठी ऑनलाईन / ऑफलाईन व्दारे ₹३० लाख रुपये पर्यंत उन्नती कर्ज टर्म लोन साठी अर्ज मागविले होते. यासाठी अर्जदारांचे जामीनदार कडे जागा प्रॉपर्टी व्हॅल्युएशन जास्त असावा असा निकष लागत असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे १० लाख ते ५० लाख पर्यंत जागेचे व्हॅल्युएशन सर्टिफिकेट मुल्यांकन पत्र दुय्यम निबंधक यांचे मागवले गेले.
महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यांतुन सुमारे ४०० -५०० अर्जदार गरजु, व्यवसायीक यांनी कर्ज मिळणार असल्याने गरज म्हणून कागदोपत्री जुळवा-जुळव केली. अनेक किचकट कागदपत्रे गोळा करणे साठी शासनाच्या विविध कार्यालयाचे उंबरठे झिजविले. चकरा मारुन-मारुन कागदपत्रे आणलीत. काहींनी तातडीने पुर्तता करण्यासाठी अधिक फी भरून तत्परतेने कागदपत्रे आणलेत. हे सर्व काही करतांना अनेक प्रकरणाची तक्रार मुस्लिम सेवा संघ सोलापूर जिल्हा अध्यक्ष मुबारक शेख यांनी पत्रकार परिषद मध्ये केली. पुढे बोलताना श्री. शेख म्हणाले की कर्जाच्या अपेक्षेने व्यवसायीकांनी व्यवसाय वाढीसाठी उन्नती मॉरगेज टर्म लोन कर्ज अर्ज सादर केले. दाखल प्रस्तावा नुसार प्रकरणाची जिल्हा स्तरावर व्यवसाय निहाय खात्री करून प्राथमिक दिलेल्या मंजुरी विचार न घेता थेट मंडळात मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, मुंबई व्यवसाचे मूल्यमापन न करता सर्व लाभार्थीना 3 लाख मंजुर करण्यात आले . नुकतेच अर्जदार नागरिक जिल्हा कार्यालयात कर्ज मंजुरी बाबत विचारांना करण्यासाठी गेले असता. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच्या सर्व कर्ज प्रकरण मंजुरी देण्यात आली असून ३ लाख रुपये फक्त मंजुर करण्यात आले आहे. असे कळल्याने ज्यांनी ५ लाख, १० लाख, १५ लाख, २० लाख, ३० लाख रुपये कर्ज मंजुरी साठी फाईल तत्परतेने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून जमा केलेली असताना फक्त ३ लाख रुपये मंजुरी देण्यात आली. ह्या तुटपुंज्या निधीचे करायचे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे निषेधार्थ असुन राज्य शासनाने लोन फक्त ३ लाख मंजूर करण्यात येणार होते तर ३ लाखापर्यंत लोन मिळेल असे जरी सुचवले असते तर नागरिकांची दिशाभूल झाली नसती. व जादा ची कर्ज मागणी असलेले व्यवसायीक नागरिकांनी अर्ज केले नसते. सांगताना कागदोपत्री २० ते ३० लाखा पर्यंत लोन सांगितले आणि मंजुरी दिले फक्त ३ लाख हे जाणून बुजून व निषेधार्थ असुन क्रुर चेष्टा केली आहे. जर लोन कर्ज ३ लाख रुपये द्यायचे होते तर मग १० ते ५० लाखांपर्यंतचे अर्जदार यांचे जामीनदाराची जागा प्रॉपर्टी व्हॅल्युएशन सर्टिफिकेट मुल्यांकन पत्र दुय्यम निबंधक यांचे का घेण्यात आले.
या ३ लाखातही २% टक्के हामी शुल्क, मंडळाचे कर्ज ५% टक्के कट करुन सुमारे २ लाख ८० हजार रुपये मिळणार असल्याने व कर्ज प्रकरणासाठी जागेवर मॉरगेज, बोजा चढवणे चा अतिरिक्त खर्च जर अर्जदार यांनाच करावयाचा आहे. मग हे कर्ज नसुन शासन चेष्टा मस्करी तर करीत नाही ना असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. शासनाने जाहिराती, बातम्या व्दारे २०-३० लाख रुपये चे भले मोठे उन्नती कर्जांचे आमीष दाखवुन सामान्य नागरिकांना दिशाभूल करुन धोखा दिलेला आहे. बरं येवढे सगळे करुन ही, जागेवर बोजा चढविले नंतर ही कर्ज मंजुर करायचे की नाही व एक रक्कमी झिजया वसुली कर्जाची करणार हे हक्क मंडळाने राखुन ठेवलेले आहे. याला चेष्टा करणे म्हणावे की आणखीन काही कळायला मार्ग नाही. लवकरच या बाबत राज्य शासनाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे व राष्ट्रीय अध्यक्ष मा. फिरोज मासूलदार साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठे जन आंदोलन उभे करण्यार असल्याचे जिल्हा अध्यक्ष मुबारक शेख यांनी सांगितले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या