नांदगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथे राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमीत्त सरपंच यादवराव काकळीज यांच्या अध्यक्षतेखाली बाल ग्रामसभा संपन्न झाली .
 ग्रामीण भागाच्या शास्वत विकासासाठी नऊ कलमी कार्यक्रमापैकी एक संकल्प करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभीयान ' जल समुद्ध गाव ' पायाभुत सुविधा ' स्वच्छ व हरीत गाव ' आदी विषया वर चर्चा करण्यात आली. 




 गावातील शाळेतर्फे बालमजूरी या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पधेंत उत्कृष्ट निबंध सादर करणाऱ्या बालकानां सरपंच यादवराव काकळीज ' सुदामराव काळे ' सोमनाथ घोंगाणे यांनी बक्षीसे दिली. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने शालेय साहीत्य बक्षीस म्हणून देण्यात आली. शाळेतील बालकांनी आपल्या समस्या मांडल्या . या समस्या वरिष्टा मार्फत लवकरच सोडवू असा विश्वास पंचायत समितीचे या ग्रामसभे साठी नेमण्यात आलेले संपर्क अधिकारी एस . के . पाटणकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.  


 सदर सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापीका सौ. छाया देशमुख यांनी केले. सभेस सरपंच यादवराव काकळीज ' सोमनाथ घोंगाणे 'सदस्य अंबादास काळे ' राजेद्र काकळीज ' सुदामराव काळे ' दतू श्रावण काळे' बाजीराव काळे ' दतू भिमराव काळे ' सतीष काळे ' अंबादास भागवत काळे ' शिक्षीका सुनीता बागूल ' आशा सेवीका उज्वला काळे ' भाऊसाहेब काळे ' शेषराव काळे ' बापू काकळीज ' नाना काळे' ग्रामपंचायत कर्मचारी नाना पवार यांचेसह ग्रामस्थ विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थीत होते .