Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी बेमुदत उपोषण मागे घेतल्या नंतर,मनमाड शहर सकल मराठा समाजातर्फे उपोषणाची सांगता करण्यात आली,


मनमाड प्रतिनिधी.

मनमाड:  आरक्षणासह मराठा समाजाच्या हितासाठी १५ मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी बेमुदत उपोषण मागे घेतले. गेल्या •तीन दिवसांपासून संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केले होते. सोमवारी सायंकाळी गृहमंत्री दिलीप वळसे •पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. राज्य सरकारने एकूण १५ मागण्या मान्य केल्याचे लेखी निवेदन शिंदे यांनी वाचून दाखवल्यानंतर संभाजीराजेंनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. याबाबतचे वृत्त कळताच मनमाड शहरात सकल मराठा समाज बांधवांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व . छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करुन मान्यवरांच्या उपस्थितीत उप विभागीय पोलीस अधिकारी समीर सिंग साळवे यांच्या हस्ते उपोषण करते यांना शरबत पाजून  सुरु  असलेल्या उपोषणाची सांगता करण्यात आली. राज्य सरकारने १५ प्रमुख मागण्या मान्य केल्या मराठा समाजातील युवकांना मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार. सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) संस्थेमध्ये रिक्त असणारी पदे १५ मार्च २०२२ पर्यंत भरणार. सारथीच्या व्हिजन डॉक्युमेंटबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ३० जून २०२२ पर्यंत त्याची पूर्तता करणार. • सारथी संस्थेच्या आठ उपकेंद्रांच्या उभारणीसाठी जमीन

देण्याचा प्रस्ताव १५ मार्चपर्यंत मंत्रिमंडळापुढे ठेवला जाणार. • अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला पूर्वघोषित १०० पैकी ८० कोटी निधी देण्यात आला असून उर्वरित २० कोटी, तसेच पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त १०० कोटी निधी देणार. • उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून यादी घेऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसतिगृह सुरू करण्यात येईल. • कोपर्डीतील घटनेतील केस महाधिवक्त्यांकडून मेन्शन
करण्यात येईल म्हणजे ही केस बोर्डावर आणली जाईल. • मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला बैठक घेण्यात येईल. सीसीटीव्ही फुटेज पाहून हा निर्णय घेतला जाईल. मराठा आंदोलनात मृत पावलेल्या १८ जणांना नोकऱ्या मिळाल्या. इतरांना ताबडतोब नोकरी देण्याचा निर्णय घेतला. मराठा आरक्षण स्थगितीपूर्वी निवड झालेल्या विद्याथ्यांना निवडीचा पर्याय देऊन अधिसंख्येची पदे निर्माण करणार. याबाबत महिनाभरात अहवाल. असे एकूण १५मागण्या मान्य करण्यात आले यावेळी भास्कर झाल्टे, भिमराज लोखंडे, विष्णू चव्हाण, विनोद डमरे, विठ्ठल नलावडे, रविंद्र नाठे, नाना घुमरे, वैभव जाधव, सुरेखा धुमाळ, सुरेखा झाल्टे, संध्या गवळी, सुवर्णा निकम, प्रतिभा चव्हाण, लक्ष्मी लोखंडे, हेमंत गवळे, रामदास दुभासे, रविंद्र नाठे, विलास करकाळे, आकाश झाल्टे, अशोक कदम आदींसह सकल मराठा समाज बांधव महिला वृंद,मराठा क्रांती मोर्चा अखिल भारतीय मराठा महासंघ, सकल मराठा समाज बांधव, पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलन सहभागी होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या