Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

रेल्वे प्रवासी संघटनेचे रेल्वे महाप्रबंधक यांना "गोदावरी एक्सप्रेस" सुरू करण्यासाठी निवेदन .... मागणी पुर्णन झाल्यास आंदोलनाचा इशारा.


मनमाड : कोरोना विषाणूच्या प्रसारमुळे गेल्या अनेक महिन्यांपासुन मनमाड ते नाशिक ते मुंबई प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासी आणि दररोज प्रवास करणारे पास धारक यांची जीवन वाहिनी असणारी 'मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस'बंद आहे. गोदावरी एक्सप्रेस ने दररोज मनमाडहुन नाशिक आणि मुंबई साठी हजारो नागरिक , विदयार्थी , कामगार वर्ग  हे प्रवास करत असतात , परंतु गेल्या अनेक महिन्यापासून गोदावरी एक्सप्रेस बंद असल्याने या हजारो नगरिकांची खुप मोठी गैरसोय होत आहे.
  
   काही महिन्यांपासुन भारतीय रेल्वे कडुन अनेक रेल्वे गाड्या या कोरोना परिस्थितीचे नियम पाळून सुरू करण्यात आल्या , या गाड्यांप्रमाणेच मनमाड- कुर्ला गोदावरी एक्सप्रेस ही  गाडी सुरू करण्यात यावी यासाठी आज मध्य रेल्वेचे महाप्रबंधक हे मनमाड येथे आले असता त्यांना रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने गोदावरी एक्सप्रेस सुरू करण्याचे निवेदन देण्यात आले. गोदावरी एक्सप्रेस चालू करण्यात यावी तसेच पासधारकांसाठी दुसऱ्या गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात यावी , गेल्या अनेक महिन्यापासुन रेल्वेच्या सर्व विभागांना गोदावरी एक्सप्रेस सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले असुन आज पर्यंत त्याचा कुठल्याही प्रकारे सकारात्मक विचार झालेला नाही , अजूनही यावर काही  होकारत्मक विचार न झाल्यास चाकरमान्यांकडुन तीव्र स्वरूपातील आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आलेला आहे. 
   या प्रसंगी प्रवासी संघटनेचे  अध्यक्ष नरेंद्र खैरे , उपाध्यक्ष संदिप व्यवहारे , ऍड ललीत आंबेकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या