Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 एस.टी.च्या संपामुळे नागरिकांची गैरसोय मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा.



मनमाड.प्रतिनिधी.


मनमाड.दीड महिन्यांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांचा | संप सुरू असल्याने जनतेचे अतोनात हाल होत असून या संपावर तातडीने तोडगा काढून जनतेची आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी मनमाडमधील नागरिक राजेंद्र धिंगान यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.


एस.टी. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. मात्र जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. ऐन सणांच्या दिवसात संप सुरू झाल्याने मोठा त्रास जनतेला झाला. अजूनपर्यंत संप सुरू असल्याने ग्रामिण भागातले दळणवळण ठप्प झाले आहे. शिक्षण घेणारे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार आदी सर्वांनाच या संपाचा त्रास सहन करावा लागत आहे. कामावर जाण्यासाठी मिळेल त्या वाहनाचा आधार घ्यावा लागतो आहे. त्यामध्ये अनेक नोकरदार अपघातग्रस्त झाले आहेत. गोरगरीबांना जास्तीचे पैसे देवून गैरसोय सोसत प्रवास करावा लागत आहे. यामुळे खाजगी वाहनचालकांची मनमानी वाढली आहे. आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घालून जनतेची गैरसोय टाळावी आणि नागरिकांची होणारी कुचंबणा दूर करावी . एस. टी. कर्मचाऱ्यांनाही न्याय द्यावा अशी मागणी धिंगान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या