Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

“NEET पेपरफुटीने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात; बहुजन समाज पार्टी तर्फे शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!”



नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळलेली असताना मनमाड येथे आंदोलकांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. नांदगाव तहसीलदार यांच्यामार्फत मंडल अधिकारी मनमाड यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, उच्च शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या NEET परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे मेहनत घेतली असताना पेपरफुटीमुळे त्यांच्या कष्टांवर पाणी फिरले आहे. काही विद्यार्थ्यांना वयोमर्यादेमुळे पुढील संधी गमवावी लागणार असून या मानसिक तणावातून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोपही करण्यात आला.

परीक्षेची गोपनीयता आणि सुरक्षितता राखण्यात केंद्र शासन व संबंधित यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पेपर तयार करणाऱ्या आणि व्यवस्थापनाशी संबंधित घटकांच्या संगनमतामुळेच ही गंभीर घटना घडल्याचे सांगत, कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून लाखो रुपयांचा काळाबाजार सुरू असल्याची टीकाही करण्यात आली.

“विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा,” अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली.

यावेळी प्रवीण पगारे, दीपक गायकवाड, शालिग्राम निकम, राजू ठेंगे, गौरव अहिरे, कैलास गायकवाड, तेजस शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या