Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड बाजार समितीतील १६२५ शेतकऱ्यांना कांदा अनुदान मंजूर: आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याचे फलित!


मनमाड बाजार समितीतील १६२५ शेतकऱ्यांना कांदा अनुदान मंजूर: आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याचे फलित!

नाशिक: मनमाड बाजार समितीतील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे १६२५ शेतकरी बांधवांचे कांदा अनुदान अखेर मंजूर झाले आहे. एकूण २ कोटी ६९ लाख ८२ हजार १५५ रुपये अनुदान रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाने २०२२-२३ दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले होते. मात्र, अनुदान अर्ज भरताना तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित राहिले होते. या समस्येकडे आमदार सुहास कांदे यांनी लक्ष वेधले आणि सातत्याने पाठपुरावा केला.त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक कार्यालयाने ३ नोव्हेंबर रोजी याबाबतची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे.

२०२२-२३ मध्ये कांदा पिकाचे भरघोस उत्पादन झाले, परंतु बाजारभाव कोसळल्याने शेतकरी संकटात सापडले होते. काबाडकष्टानंतरही योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी वैफल्यग्रस्त झाले होते. ही व्यथा लक्षात घेऊन सर्व लोकप्रतिनिधींनी सरकारकडे पाठपुरावा केला आणि अनुदानाचा निर्णय घेण्यात आला. या अनुदानामुळे मनमाड बाजार समितीतील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला असून, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य परतले आहे.

आमदार सुहास कांदे यांनी याबाबत आनंद व्यक्त करताना म्हटले की, "शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यांच्या समस्या सोडवणे ही आमची प्राथमिकता आहे. हे अनुदान शेतकऱ्यांना नवी ऊर्जा देईल." शासनाच्या या निर्णयामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळाला असून, कृषी क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या