Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

शिवसेनेची मागणी! मनमाडच्या अभय योजनेची मुदत वाढवा; नागरिकांना दिलासा देण्याची गरज


मनमाड (प्रतिनिधी): नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या पुढाकाराने मनमाड नगरपरिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या अभय योजनेची मुदत वाढवण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरेसे यांनी केली आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मालमत्ता करातील सवलतीचा लाभ मिळत असून, आर्थिक अडचणींमुळे अनेकांना याचा फायदा घेता आलेला नाही. त्यामुळे या योजनेचा कालावधी वाढवून अधिकाधिक नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी बोरेसे यांनी नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात बोरेसे यांनी नमूद केले की, अभय योजनेमुळे नागरिकांना कर भरण्याची संधी उपलब्ध झाली आहे, परंतु आर्थिक संकटांमुळे अनेकांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. योजनेची मुदत वाढल्यास नागरिकांना अधिक संधी मिळेल आणि नगरपरिषदेच्या महसुलातही वाढ होईल. 

शिवसेनेच्या या मागणीमुळे मनमाड शहरात चर्चेला उधाण आले आहे. नगरपरिषदेने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

शिवसेनेच्या या मागणीमुळे अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांमध्ये नव्याने उत्साह निर्माण होण्याची शक्यता आहे. नगरपरिषद काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या