Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी भूमिका, स्व.रफिक भाई मित्र मंडळ तर्फे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन,


मनमाड :- मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून, उपवास सोडण्यासाठी नुकतेच रफिक भाई मित्र मंडळ तर्फे मनमाड बोहरी कांपाउंड येथे रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पाडला,


मनमाड येथे रविवारी सायंकाळी 6: 47 मिनीटांनी इफ्तार पार्टी झाली. यावेळी  मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती श्री दीपक गोगड यांनी देखील या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या या वेळी समाजसेवक मजीद भाई शेख (दादा ) यांनी सांगितले की, सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे आवश्यक आहे. सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन होणेसुद्धा महत्त्वाचे आहे. दोन समाज एकत्र आल्याने मतभेद दूर होऊन बंधु भावना वाढीस लागण्यास मदत होते. अशा सणांमुळे हिंदू-मुस्लिम बांधव मनापासून एकत्र येतात. म्हणून सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत होत असून त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते. आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टी महत्त्वाची भूमिका आहे. तरी रोजा इफ्तार पार्टीला आलेल्या सर्व मान्यवरांचे मी रफिक भाई मित्र मंडळ तर्फे हार्दिक स्वागत व आभार व्यक्त करतो असे मत समाजसेवक मजीद भाई शेख दादा तर्फे भावना व्यक्त करण्यात आले,

यावेळी माजी नगरसेवक संतोष आहिरे, उल्हास डफळे, कयाम सैय्यद, आदम भाई, रवी निकम, मोनीश चाबुकस्वार, गणेश एळींज, बोहरी कंपाउंड व शहरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या